खोपोली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपोली नगर परिषद हद्दीत असणारे हाल बुद्रुक मिल्लत नगर गावातील बुधवार दि.04 जून2025 रोजी सकाळी मुसधार धो- धो बरसणाऱ्या पावसात उच्च दाबाची विद्युत वाहक तार तुटून एका राहत्या घरावर कोसलळी काळ आला होता पण वेळ आली नव्हती सुदैवाने घरा बाहेर व या परिसरात कोणच चालते फिरते उभे नसल्यामुळे मोठी दुर्घटना टल्ली.गेल्या आठ दिवस आधी रिलायन्स पेट्रोल पंप समोरील अंतर्गत जाणाऱ्या रस्त्यावर अशीच विद्युत वाहक तार तुटून चालू अवस्थेत पडली असल्याने दोन भटक्या कुत्र्यांचा विजेचा झटका लागल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. आता आमचे बळली जाण्याची वाट महावितरणाचे अभियंता कर्मचारी पाहात दूरलक्ष करीत आहात का? अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
झुकलेले विद्युत खांब, लोंबकळलेल्या विजेच्या तारा वाऱ्याबरोबर हेलकावे घेत असल्याचे चित्र खोपोलीतील अनेक गावांच्या परिसरात आहे. याकडे महावितरण कंपनीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.वास्तविक पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व कामे जलदगतीने करणे गरजेचे होते.मात्र महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप खोपोलीतील नागरिकांनी केला असून मान्सूनपूर्व कामे लवकर करून वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा ओढून घेण्याची मागणी नागरिकांनी केली असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे आहे.हाळ बुद्रुक परिसरासह खोपोलीतील तेसच ग्रामीण भागात अंदाजे ३५ ते ४० वर्षांपूर्वीची विद्युत वाहक यंत्रणा आहे. त्यामुळे जुन्या विद्युत वाहक तारा, खांब कमकुवत झाले आहेत. परिणामी थोड्याशा सोसाट्याच्या वाऱ्याने तारा एकमेकांना घासल्यास वीजपुरवठा खंडित होतो; तसेच वारा जास्त वेगाने आल्यास खांब वाकतात. कित्येक ठिकाणी विद्युत खांबाचे ताण गायब झालेले आहेत, मात्र वीज वितरण कंपनीने हे ताण पुन्हा बसविण्याची तसदी घेतली नाही. वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विद्युत उपकेंद्रांतर्गत येणाऱ्यी क्षेत्रात तारा, खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे, ताण देणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे, तुटलेल्या तारा जोडणे, झाडांच्या फांद्या छाटणे ही कामे प्राधान्याने करणे गरजेचे असतांना याकडे महावितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे ग्रामस्थानांचे म्हणणे आहे.
पावसाळ्यात विद्युत सुरक्षेचे नियम पाळा, अपघात टाळा ! – महावितरणचे आवाहन…जमिनीवर तुटून पडलेल्या विजतारांना स्पर्श करू नये आणि लोंबकळणा-या विजतारांपासून सावध राहावे…..पावसापासून बचाव करताना आजूबाजूला जिवंत विद्युत तारा धोकादायक स्थितीत नसल्याची खात्री करून घ्यावी….मिटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मिटरचे मुख्य स्वीच बंद करावे व जागा बदलून घ्यावी..पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असल्याने घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून अधिक सावध राहणे आवश्यक आहे. वीज दिसत नाही, पण परिणाम मात्र जीवघेणे असतात. त्यामुळे विद्युत अपघात टाळण्यासाठी सतर्कता व योग्य खबरदारी हाच सर्वोत्तम उपाय आहे. पाणी हे विजेचे वाहक असल्याने विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावेत. महावितरणच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये. ओलसर हातांनी विजेची उपकरणे हाताळू नयेत. ही उपकरणे खिडकी तसेच बाल्कनीपासून दूर ठेवावीत. जेणेकरून त्यात पावसाचे पाणी जाणार नाही. विद्युत उपकरणे ओलसर झाले असल्यास ते त्वरित बंद करून प्लगसह बाजूला करावे. तसेच पावसाळ्यात कपडे वाळत घालण्यासाठी लोखंडी तार वापरू नये. ही तार विजेच्या खांबाला किंवा इतर वीज यंत्रणेला बांधू नये असे सांगण्यात येते मात्र राहत्या घरावर तार कोसळणे… रस्त्यावर तार कोसळणे… धोकेदायक वाकलेले विद्युत खांब वेळेवर न बदलणे… ह्याला नांगीक जबाबदार का? रस्त्यावर ये-जा करतांना किंवा घरावर उच्च दाबाची विद्युत वाहक तार तुटून कोसळून नागरिकांचे नहक जीव गेल्यास यात ही नागरिकांचीच चूक राहणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.